मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

आठवणींच्या निमित्ताने

 आठवणींच्या निमित्ताने..

सोबतच्या माणसांबरोबरचे अनेक चांगले-वाईट अनुभव हे प्रत्येकाच्याच गाठीला आहेत पण म्हणून सर्वच गोष्टी या सोशल मीडियावर बोलायच्या नसतात, घरच्या गोष्टी या घरातच ठेवायच्या असतात. 'आठवणींतून' व्यक्त होताना सर्वच गोष्टी समोरच्याला सुखावतील असे नाही त्यामुळे ज्यांतून आपले ऋणानुबंध दृढ होतील अश्याच बाबींचा येथे ऊहापोह होणे हे इष्ट!! 

व्यक्त होत असताना आपण घेतलेल्या या शब्दांचा आधार मुळातच त्रोटक असतो.. आणि त्यात त्यातून निघणाऱ्या अर्थांबाबत कुणी काय बोलावे??  म्हणूनच हे शब्द वापरताना 'घाई तर होत नाही ना?' हे जरूर तपासावे. शब्दांत फार ताकद असते- त्यातून कधी कुणी सुखावलाही जाईल तर कुणी दुखावलाही जाईल! लिहिणाऱ्याचा हेतू कितीही स्वच्छ असला तरी पाहणाऱ्याच्या नजरेतून ते कसे दिसेल याचा नेमका अंदाज कुणालाही बांधता येणार नाही. आठवणींना पाहत असताना सर्वस्वी त्यांना आपल्याच नजरेतून पाहत असतो पण  त्याचवेळी त्याच आठवणी दुसऱ्यासाठी काही वेगळा अनुभव असतो. त्या-त्या प्रसंगाची भावनिक गुंफण मनामध्ये अगदी वेगवेगळ्या तऱ्हेने आपण करीत असतो. म्हणूनच अश्या आठवणींना सोशल मीडियाद्वारे उजाळा देताना कधीही काळजी घेतलेली बरी!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा